हिरवं सोनं...
काही महिन्यापूर्वीच भारतीय वन अधिनियम १९२७ मध्ये बदल करणारं एक विधेयक संसदेत संमत झालं. या विधेयकामुळे आता बांबू या वनस्पतीला ‘वृक्ष’ या शब्दाच्या व्याख्येतून वगळण्यात आलं आहे. कायद्यातील या नव्या बदलामुळे आता वनक्षेत्राबाहेरील भागात असलेल्या बांबूची तोड आणि वाहतूक करण्यावरचे सरकारी निर्बंध उठले आहेत.